आज पहाटे जेव्हा माझे डोळे उघडले
मला न कलले का मग माझे मन गोंधलले
उठता जेव्हा पाऊलात मग मी अड़ खलले
न जाने कुणी हात देऊनी मज सावरले
अघटित काही घडते आहे का मला भासले ?
मार्गी चालता डोळ्यां पुढे ते धुके दाटले
बाहेर येऊनी जे दृश्य पाहिले सुंदर काही
मज वर्णाया शब्द ही आता स्मरतच नाहीत
बाग़ ती माझीच होती
अंगनी माझ्याच फुलली
घातले शब्दांचे दाने
ओतले अश्रुंचे पानी
ख़त ते होते विश्वासाचे
किरणे होती भावनांची
रुजले रोप बागेत माझ्या
नाव त्याचे काय सांगू
तुझ्याच मैत्रीचे ते रोप
काय त्याचा बहर सांगू
फूले पड़ती आनंदाची
सावली ती आधाराची
सुगंध तो उल्हासाचा
सल्सलती पाने चैतन्याची
हात ते होते तुझेच
ज्यांनी मला सावरले ते
नकलले मलाच माझे
शब्द हे स्फुरले कसे ते
मैत्रीची ही शिदोरी आपुल्या साठीच असते
ओलखावे खरे मित्र ही एक कसोटिच असते
Marathi Kavita : खरे मित्र
Info Post
0 comments:
Post a Comment