आत्ताच कुठे हसण शिकलोय मी
रडण्याची भिस्तच मुळी उरली नाही...
झेलतोय परिस्तिथिचे घाव जिव्हारी
वेदनांची संवेदनाच भूललोय मी...
प्रकाशमान व्हायचंय मज
तेजपुंज त्या मित्रासम...
अन कवेत घेवूनी सारे विश्व
हरवायचय त्या सिकंदरास...
जन्मलो म्हणून जगणार नाही
अन असाच राखेत विरणार नाही...
ठसे सोडूनी जाईन जीवन काठावरती
आल्या लाटा कितीही , मिटणार नाही ...
--संदेश
Marathi Kavita : मी...
Info Post
0 comments:
Post a Comment