आज अखेर तो दिवस आला
भेटणार शेवटचे प्रत्येकाला...
ओठावर होते
प्रत्येकाच्याच हसु...
डोळ्यात मात्र भरलेले
काठोकाठ अश्रु...
कुणी
झालेल्या चुकांची माफ़ी मागत होता..
तर कुणी
केलेल्या मजा-मस्तीची उजळणी करत होता...
आठवत होता प्रत्येकजण
क्षण आणि क्षण...
ते कॅन्टीन मधे बसणं,
लेकचर बंक करणं,
सिनेमाला जाणं
नाहितर कॉलेजबाहेरच्या कट्ट्यावर बसून
टाईमपास मरणं...
किती पटकन
सारं काही बदललं..
३-४ वर्ष निघुन गेली
हे आजच कळलं...
व्हॅलेंटाईन डे अन फ़्रेन्डशिप डे
येतील अजुनही
पण मजा नसेल आज नंतर
त्याला तशी....
कितितरी आज इथे ह्या जागी सोडून
जावं लागणार...
रोज सोबत राहणारे मित्र-मैत्रिणी
आता कधीतरीच भेटणार....
प्रत्येक जण आजचा हा दिवस जगून घेत होता
कारण आज कॉलेजचा शेवटचा दिवस होता....
Marathi Kavita : दिवस अखेरचा...
Info Post
0 comments:
Post a Comment