Breaking News
Loading...
Wednesday, 28 April 2010

Info Post
भन्नाट चारोळ्या एकत्र करुन तयार झालेली जुगलबंदी खास तुमच्या साठी...

तुझेही पाय मातिचेच असतिल
याची जाणिव आधिच होती
म्हणुनच तुला वाहिलेली प्रत्येक ओंजळ
सुंदर फुलांची पण कागदिच होती !

तुझे काय ते तुला माहित
प्रेम माझे खरे होते
तुला ओळखता नाही आले
मी तर सर्वस्व तुला वाहिले होते

 मन होतं माझं कुठेतरी हरवलेलं,
पण तरी ते तुलाच शोधत होतं,
तुला खरच ओळखता नाही आलं,
ते फक्त तुझ्यासाठीच झुरत होतं.

कळलच नाही कधी मला
तुझ ते आतल्या आत जळण
जवळ असून ही लक्ष्यातच आल नाही
तुझ एकटीचच तरफडण

जवळ असून ही लक्ष्यातच आल नाही
कारण तुझी कळी कधी खुललीच नाही
मिट्लेल्या ओठामागची
निःशब्द भाषा कळलीच नाही

ओठ जरी माझे मिटलेले
डोळे मात्र उघडे होते
तू ओठातून फूटणार्‍या शब्दाची वाट पहिली
पण डोळ्यानी ते कधीच वेक्त केले होते...

डोळ्यांनी व्यक्त केलेस
ते डोळ्यानिच ऎकले
पापण्या मिटता मिटता
आसवांनीच टिपले

आसवांची फुलेच दिलीस मला तु
मौन राखिले तरी
का डोळ्यात तुज्या सदा प्रश्नभाव
राजसा प्रीत माजी हि खरी 

खरी जरी असेल प्रित तुझी...
का केली नाही तु व्यक्त...
सदा वात बघण्यात तुझी...
आटले माझ्या देहाचे रक्त...
   

अव्यक्ताला व्यक्त होण्याची
वाट मीही पाहिली
तू या वाटेवर वळण्या आधिच
मग ही वाट का ग संपली

मी तर तेथेच होते वाट बघत....
तुझिच नजर ना वळली....
प्रित मझ्या मनाची सदा...
तुलाच ति का न कळली???

वाट होती अजून शिल्लक
प्रवासच संपला
ज्याचा त्याचा वाटा जितका
त्याचा त्याला मिळाला.

  स्रोत : orkut.com

0 comments:

Post a Comment