Breaking News
Loading...
Tuesday, 13 April 2010

Info Post
कधी खूप आहे ,कधी ताट खाली
असे भाग्य माझे सदा घोळ घाली...

कसा लेख भाळी कुणा आकळेना
जपू गोड नाती,मनाची खुशाली...

झळा झेलल्या मी, कळा सोसल्या मी
सुखाची शिदोरी अनायास आली....

कधी ऊन होते कधी गार वारा
निशेच्याच मागे उषेचीच लाली...

किती कष्ट होवो, किती ताण येवो
मनाला म्हणालो, हसू ठेव गाली...

न मागे तयाला मिळे सर्वकांही
कृपा ही तयाची सदाचीच झाली...

जरी तो दिसेना कुठे आढळेना
तरी या जगाचा असे तोच वाली...

....... अरविंद

0 comments:

Post a Comment